Wednesday, August 23, 2006

कुस्तीतील "राजा हरिश्‍चंद्रा'ला जीवनगौरव

महान कुस्तीगीर आणि निष्ठावान प्रशिक्षक हरिश्‍चंद्र बिराजदार यांना केंद्र सरकारचा ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे लातूर्च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. यापुर्वी "काका पवार" या लातूर्च्या कुस्तीविरास अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

या पुरस्कारामुळे आतापर्यंतच्या कामाचे चीज झाले असून, यानंतरही आणखी जोमाने मल्ल घडवेन, अशी प्रतिक्रिया श्री. बिराजदार यांनी व्यक्त केली....

""पोटाच्या दुखण्यामुळे मला कुस्ती अचानक थांबवावी लागली, तेव्हा निराश झालो होतो. मात्र प्रशिक्षण सुरू केल्यानंतर पुन्हा मन रमले. गोकुळ वस्ताद तालमीत मी गुरुकुल पद्धतीने मल्ल घडवितो आहे. या कामी तालमीचे अध्यक्ष शंकरराव आगाव, चिटणीस व्यंकटराव परसे, उपाध्यक्ष पंढरीनाथ पठारे अशा सर्वांचेच बहुमोल सहकार्य मिळत आहे,'' असे श्री. बिराजदार म्हणाले.

"रुस्तम-ए-हिंद' हरिश्‍चंद्र बिराजदार
- १९६९ मध्ये दादू चौगुले यांना हरवून "महाराष्ट्र केसरी' किताब, त्याच वर्षी कानपूरच्या स्पर्धेत "हिंदकेसरी' किताब.
- ७० च्या एडिंबरा (स्कॉटलंड) राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण.
- ७१ मध्ये नेत्रपालला हरवून "रुस्तम-ए-हिंद'चा बहुमान.
- ७७ मध्ये दिल्लीचा नामवंत मल्ल सतपालला बेळगावच्या मैदानात चितपट केले. हाच कारकिर्दीतील परमोच्च बिंदू.
- गोकुळ वस्ताद तालमीत गुरुकुल पद्धतीने मल्ल घडविण्याचे कार्य गेले एक तप सुरू. अर्जुन पुरस्कार विजेता काका पवार, गोविंद पवार, राजेश बारगुजे आदी अनेक नामवंत मल्लांना मार्गदर्शन.

माझे कॉलेज

माझ्या महाविद्यालयाचे (MIT Pune) विमानातून घेतलेले हे छायाचित्र.


Tuesday, August 22, 2006

बाप

बरेच प्रस्थापित तसेच नविन साहित्यीक "आई" या विषयावर लेखन करतात. पण वडिलांबद्दल कोणी फारसे लिहीलेले ऐकण्यात नाही. अशाच दुर्मिळ लिखानापैकी एक लेख माझ्या हातात आला. तो तुम्ही या लिंकवर वाचू शकता.

*~-मेगा बम्पर ऑफर ~*

इस ब्लॉग्पर comment भेजें और जीतें आकर्षक पुरस्कार........

* 10 लाख रूपये वाली कार का फोटो
* 29" टी.वी. का बॉक्स
* लंदन जाने वाले हवाई जहाज को "टाटा" कहने का सुनहला अवसर
* और अन्तिम किन्तु सबसे आकर्षक ईनाम......
"मेरे साथ डिनर, आप के घर"

Saturday, August 19, 2006

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे......... कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,

म्हणुन....................म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

स्वातंत्रदिन

प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीदेखील मी स्वातंत्रदिन साजरा करण्यासाठी MIT महाविद्यालयात गेलो होतो. या cadetsना राष्ट्रीय ध्वजास संपूर्ण गर्वाने Salute करताना पाहणे खरोखरच खूप प्रेरणादायी असते. या parade नंतर एक बैठक व त्यानंतर मस्त मेजवानी असे कार्यक्रमाचे स्वरूप असते. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे..







Friday, August 18, 2006

कलेचे राजनितीकरण

मागील काही दिवसांपासून मी वृत्तपत्रामधून दादासाहेब फाळके पारीतोषिकाबद्दलच्या बातम्या वाचतोय. त्यात प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते. हे वृत्तपत्र कला क्षेत्रात राजनिती आणण्याचा प्रयत्न करतोय. उदा. "बंगाली नायिकेस पारीतोषिक मिळावे म्हणून सोमनाथ चॅटर्जी, प्रियरंजन दासमुन्शी, प्रनब मुखर्जी इ. नेते प्रयत्न्शील", "महाराष्ट्रातर्फ़े फक्त शरद पवार प्रयत्न करत आहेत" अशा प्रकारच्या बातम्या या वृत्तपत्रातून येत आहेत.
काय आपल्याकडे पारितोषिकांचा इतका खराब काळ आला आहे की आता हे राजकिय नेते पारितोषिकासाठी पात्र व्यक्ती ठरवणार? असेही राजकीय नेत्यांपेक्षा जास्त "नौटंकी" कोण करू शकतो?
७५ पेक्षा जास्त वर्षांची परंपरा असणारे हे वृत्तपत्र एकिकडे खेळात राजकारण आणल्याबद्दल नेत्यांवर टिका करतो आणि दुसरीकडे त्याच नेत्यांकडून अपेक्षा करतो की त्यांनी कलेच्या क्षेत्रात राजकारण आणावे. या दुटप्पीपणाच्या धोरणाला काय म्हणावे?

Sunday, August 13, 2006

रायगड


अवघ्य़ा महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचे रायगड हे राजधानी स्थान. याच ठिकाणी छत्रपतींची समाधीदेखील आहे.
या गडाचे google earth द्वारा घेतलेले हे छायाचित्र..

पाणी

बरेच दिवस झाले मराठीत काही लिहीले नाही. काय लिहावे हे सुचतच नाही हल्ली. पूर्वी पावसाला पाहून मस्त कविता सूचत. हल्ली फक्त भीती वाटते.
मान्सून पावसाच्या आगमनाच्या वेळी मी खूप खूश होतो. मी माझ्या ब्लॉगवर देखील त्या बातम्या टाकत होतो. मॉन्सून आला, बरसला आणि बरसतच राहीला. परत जाण्याआधी तो एक भेट्वस्तू मात्र देऊन गेला. पाणी.. खूप पाणी.. सगळीकडे पाणी.. पाणीच पाणी.. फक्त पाणी.... घरात, दुकानांत, कारखान्यांत, रस्त्यात आणि डोळ्यांत..
बाकी सगळीकदचे पाणी तर निघून जाईल.. पण डोळ्यांचे काय? ते पाणी कोण शोषून घेणार?

Saturday, August 12, 2006

धूम्रपान एक कार्य महान

सिगरेट है संजीवनी
पीकर स्वास्थ्य बनाओ
समय से पहले बूढ़े होकर
रियायतों का लाभ उठाओ

सिगरेट पीकर ही
हैरी और माइकल निकलते हैं
दूध और फल खाकर तो
हरगोपाल बनते हैं
जो नहीं पीते उन्हें
इस सुख से अवगत कराओ
बस में रेल में घर में जेल में
सिगरेट सुलगाओ

अगर पैसे कम हैं
फिर भी काम चला लो
जरूरी नहीं है सिगरेट
कभी कभी बीड़ी सुलगा लो
बीड़ी सफलता की सीढ़ी
इस पर चढ़ते चले जाओ
मेहनत की कमाई
सही काम में लगाओ

जो हड्डियां गलाते हैं
वो तपस्वी कहलाते हैं
ऐ कलयुग के दधीचि
हड्डियों के साथ करो
फेफड़े और गुर्दे भी कुर्बान
क्योंकि…
धूम्रपान एक कार्य महान

Google