Saturday, November 04, 2006

पाऊस

आज ब~याच दिवसांनी अगदी मस्त पाऊस पडला. आणि मनाला एक वेगळाच ठंडावा देऊन गेला. पावसापूर्वीच्या आकाशाचे हे छायाचित्र आम्ही आमच्या कॉलेजच्या गच्चीवरून घेतला आहे.

Friday, November 03, 2006

किंग खानचा वाढदिवस

काल आम्ही शाहरूखचा वाढदिवस साजरा केला. वास्तविक शफ़ि हा शाहरूखचा निस्सिम चाहता आहे. आणि तो दरवर्षी शाहरूखचा वाढदिवस साजरा करतो. या वर्षी आम्ही त्याला मदत करायचे ठरवले. आम्ही मस्त केक आणि पेढे आणले होते. आम्ही केक कापला, मिठाई वाटली आणि खूप फोटो काढले. त्यापैकीच काही फोटो इथे केवळ आपल्यासाठी..




Tuesday, October 31, 2006

सेक्स

नाव वाचूनच ब~याच भुवया उंचावल्या असतील. आपल्याकडे सेक्स व सेक्स एज्युकेशनकडे ज्या लाज आणि घ्रुणेच्या द्रुष्टीने पाहीले जाते ते बघून खूप वाईट वाटते. Blogs लिहीणारे तसे तर अधिक शिकलेले व विचार करणारे मानले जातात. मात्र त्यांचेदेखिल विचार पाहून स्थिती खूप चांगली आहे असे वाटत नाही.
तसेतर मला बरंच काही सांगायचय या विषयावर. पण सर्व काही मराठीत लिहीणं खूप तापदायक आहे. त्यामुळे सध्यातरी मी तुम्हाला माझ्या दुस~या ब्लॉगवरचे हे टिपण वाचायची विनंती करेन.

याला झाड ऐसे नाव


इतरांसाठी हे फक्त एक झाड आहे. पण मला या चित्रात काहीतरी विशेष वाटले. हे झाड माझे आयुष्य दाखवते.
एक सुकलेलेसे झाड. मध्येच मधमाश्याचे पोळे. एक मोठा ब्रेक दर्शवणारे. मात्र त्या ब्रेकनंतर सगळीकडे हिरवी पाने.. काही चागले दिवस दर्शवणारे..
आणि सगळीकडे शेवटी फुले आहेत. Happy Ending दाखवणारे..

हे चित्र काढले आहे MSpaint मध्ये आमच्या office मधील सेवक शफी ने ज्याने नुकतेच संगणक शिकायला सुरूवात केली आहे..

Sunday, October 22, 2006

पुन्हा एकदा मी



आता स्वतःबद्दल काय बोलनार? तुम्हीच सांगा आपली मते या छायाचित्रांबाबत..

ऑरकुटा मुलगा आणि त्याचा बाप

आजच्या ऑरकुटच्या जगात आपण आपल्या दुरदेशीच्या मित्रांसोबत अगदी आरामशीर संपर्कात राहू शकतो. मात्र आपल्या घरच्यांसोबत मात्र आपला संपर्क व संवाद बराच विसंवाद होत चालला आहे. हीच कथा आणि व्यथा विनोदाच्या माध्यमातून आपल्या समोर आणली आहे मुकुंद टाकसाळे यांनी सकाळ या वर्तमानपत्राद्वारे.
जे लोक हा अंक वाचू शकले नाहीत त्यांच्यासाठी हा प्रयत्न.

अशीच एक जूनमधल्या रविवारची भिजकी सकाळ. बाहेर पाऊस नुसता कोसळतोय! सकाळची आठची वेळ. मी गुडूप पांघरूण घेऊन साखरझोपेत. मला मधुमेह असूनही डॉक्‍टरांनी या झोपेवर बंदी आणलेली नाही, हे नशीबच म्हणायचं! नाही तर ("पहाटेची सॅकरिन झोप घ्या', असं म्हणायलाही हे डायबेटिसचे स्पेशालिस्ट डॉ. गोडबोले कमी करायचे नाहीत.) या साखरझोपेत असताना "एखादा रेडा आपल्या शिंगांनी मला ढुसण्या देऊन उठवतो आहे,' असा भास मला झाला. नंतर लक्षात आलं, की हा "भास' नसून "वास्तव'च आहे. कारण त्या रेड्याची शिंगं मला टोचल्याचं स्पष्ट जाणवत होतं. मी दचकून जागा झालो आणि ताडकन अंथरुणावर उठून बसलो, तर काय आश्‍चर्य! साक्षात विकीच मला एका काठीनं ढोसून जागा करत होता.

विकी हा आमचा एकुलता एक मुलगा. सध्या दहावीला आहे. पण अभ्यासाच्या नावानं बोंब! मी मॅट्रिकला होतो तेव्हा आमचे वडील पहाटे पहाटे आमच्या पार्श्‍वभागावर लाथ घालून अभ्यासाला उठवायचे. सध्याच्या आधुनिक मानसशास्त्रात ही आदिम पद्धत बसत नसल्यानं मी मनावर संयम ठेवून त्याला गोड बोलून अभ्यासाला बसवण्याचा प्रयत्न करतो. पण जे मानसशास्त्र मला ठाऊक आहे, ते विकीला ठाऊक नसल्यानं तो माझ्या प्रेमळ स्वभावाचा फायदा घेऊन अभ्यास करायचं टाळतो.

नंबर एकचा हूड! कुणाची काय खोडी काढेल, सांगता यायचं नाही. परवा दुपारी माझे सासरे श्रीखंडाचं जेवण करून दुपारचे डाराडूर झोपले होते, तर यानं बाजूला पडलेल्या वर्तमानपत्राच्या कागदाचा तुकडा फाडला आणि त्याची बारीक सुरळी करून सासरेबुवांच्या नाकात घातली. छप्पर कोसळून पडेल अशा शिंका देत बिचारे घाबरून उठले, तर हा फिदीफिदी हसतोय नुसता!

माझा "संवादा'वर विश्‍वास असल्यानं मी त्याला समजावून चार चांगले संस्कार त्याच्यावर करण्याच्या प्रयत्नांत असतो. पण तो मी बोलू लागलो की एक तर जांभया देऊ लागतो, नाही तर खिडकीतून बाहेर बघू लागतो, नाही तर सरळ उठून कॉम्प्युटर सुरू करतो आणि तासन्‌तास ऑरकुटवर बसून राहतो. "ऑरकुट' हे काय प्रकरण आहे, ते आजतागायत माझ्या लक्षात आलेलं नाही. एखाद्याला "मारकुटा' जसं म्हणतात तसं गमतीनं त्याला मी "ऑरकुटा' हे विशेषण बहाल करतो. म्हणजे "माझा ऑरकुटा मुलगा- विकी' असं संबोधतो. एखाद्या वैतागवाण्या गोष्टीकडं विनोदानं बघितलं की आपोआपच त्याची तीव्रता कमी होते, असा माझा आजवरचा अनुभव आहे.

तर अशा या विकीनं आठवड्यातून एकदाच येणाऱ्या रविवारी मला माझ्या साखरझोपेतून काठीनं ढोसून उठवल्यामुळे मी त्याच्यावर जोरात खेकसलोच, ""विक्‍या, हा काय आचरटपणा आहे?'' त्याच्या पाठीत धपाटा घालायला माझे हात शिवशिवत होते.

दोष माझा नाही. सकाळी झोपेतून उठत असताना आपल्या अबोध मनाला मानसशास्त्र वगैरे आठवत नाही. यावर खीःखीःखीः हसत तो कवायत करणाऱ्या पोलिस शिपायाप्रमाणे हातात काठी घेऊन ताठ उभा राहिला आणि म्हणाला, ""सरप्राइज! सरप्राइज!''

मी काठीवरून माझ्या नजरेचा कॅमेरा टिल्ट-अप करत वरच्या टोकाला नेला आणि आनंदाश्‍चर्यानं थक्कच झालो. काठीच्या वरच्या टोकाला एक बोर्ड होता आणि त्यावर लिहिलेलं होतं, ""हॅप्पी फादरज्‌ डे!'' नंतर त्यानं हेही कमी म्हणून की काय, खिशातून गुलाबाचं एक फूल काढलं आणि कमरेत मोठ्या नम्रपणे वाकून ते एका भेटकार्डाबरोबर माझ्या हातात दिलं. भेटकार्डावर "आय लव यू, डॅडी' असं लिहिलेलं होतं. खाली "देअर इज नो बडी/लाइक यू डॅडी' असली काही तरी कविताही होती. माझ्या डबडबलेल्या डोळ्यांना पुढच्या काव्यपंक्ती वाचताच आल्या नाहीत. शिवाय चष्माही डोळ्यावर नव्हता.

तसाही विकी मला "डॅडी' म्हणत नाही, "बाबा' म्हणतो. खरं तर "बाबा' तरी कुठं म्हणतो म्हणा! तो नेहमी मला "पॉप्स' असंच म्हणतो. सुरवातीला तो गमतीनं हे म्हणायचा. नंतर त्याच्या जिभेला तसं वळणच पडलं.

""पॉप्स, हॅप्पी फादरज्‌ डे!'' सुहास्य वदनानं विकी उद्‌गारला.

""थॅंक्‍यू- थॅंक्‍यू.'' मी तत्परतेनं म्हणालो, ""पण हा सण कुठला काढलास?''

"तुम्ही मागं मला आपल्या कल्चरची माहिती देताना बैलपोळ्याबद्दल सांगितलं होतं, आठवतंय? हा तसाच सण आहे; पण परदेशी. जसं आपण बैलांशी एक दिवस चांगलं वागतो, त्यांना प्रेमानं वागवतो, तसं या दिवशी...''

""आलं लक्षात. मग असाच मदरज्‌ डेही असणार.'' मी आपलं तर्कानं म्हणालो.

""असतो ना. मदरज्‌ डे, ब्रदर्ज डे, सिस्टरज्‌ डे... असे तिकडं डेच डे साजरे करतात. प्रत्येकाचा वर्षातून एकेक दिवस. एव्हरी डॉग हॅज हिज डे...''

""अरे! अरे, माणसं वेगळी, डॉग वेगळा. "युवा, श्‍वा, मध्वा' हे तिन्ही तू एकत्र गुंफतोयस.'' मी त्याला माझा मुद्दा थोडा अवघड करून सांगितला.

""पॉप्स, धिस इज रॉंग. मध्येच संस्कृतमध्ये बोलायचं नाही. बॅड मॅनर्स.''

""तसं नाही. पण माणसांचे दिवस आणि प्राण्यांचे दिवस सारखेच?''
""पॉप्स, आम्ही फ्रेंड्‌स "पेट्‌स डे' पण सेलिब्रेट करतो. त्या दिवशी प्रत्येकाच्या पेटला विश करतात. मानसीनं तर बैलाप्रमाणे तिच्या डॉगीला ओवाळलंसुद्धा... किती छान नं....?''
""हो हो.'' मी मान हलवत म्हणालो.
फादरज्‌ डे, मदरज्‌ डे अशा डेजमागची कन्सेप्ट अशी आहे, की वर्षभर आपण ज्यांच्याशी वाईट वागतो, त्यांच्याशी एक दिवस का होईना, पण चांगलं वागायचं. ते आपल्यासाठी जे काही करतात, त्याबद्दल त्यांना "थॅंक्‍स' द्यायचे.
माझं मन मुलाविषयीच्या प्रेमानं भरून आलं. एक दिवस का होईना, पण वडिलांविषयी कृतज्ञता दाखवायची. आपल्या संस्कृतीत हे बसत नाही. आपण वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस बापाबद्दल मनात संतापच वागवत असतो. एखाद्या दिवशी का होईना, पण ही अशी प्रेमाची झुळूक किती छान वाटते!

विकीबरोबर संवाद साधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. मी मनात म्हटलं, आज त्यानंच त्याच्याकडून बर्फ फोडलेला आहे, तर आज ही संधी घेऊन त्याच्याशी संवाद साधू या.
""विकी बेटा।-'' मी आवाजात गोडवा आणून सुरवात केली.
""प्लीज पॉप्स. आता बोअर मारू नकोस. नाही तर मी जातो.'' विकी उठलाच एकदम.
"अरे, थांब, थांब. हे बघ, आज तू फादरशी चांगलं वागणार आहेस ना? मग माझ्याशी दोन शब्द गोड बोल तरी. एकमेकांत संवादच नव्हे, तर सुसंवाद हवा. डायलॉग.''
""म्हणजे तुम्ही डायलॉग मारणार आता? प्लीज...'' असं म्हणून तो उठला आणि कॉम्प्युटरपाशी जाऊन त्यानं ऑरकुटमध्ये डोकं खुपसलं.
""विकी, ऑरकुटवर जाऊन तू काय करतोस? तिथल्या मित्रांशी गप्पा मारतोस, बरोबर? अरे, मग मी तुझा मित्रच आहे. माझ्याशी गप्पा मार. माझ्याशी दोन शब्द बोल.'' मी त्याला कळवळून म्हणालो.

""पॉप्स, ऑरकुटवर काय गंमत असते ते तुला नाही कळणार.'' विकी कॉम्प्युटर स्क्रीनवरची नजर न हटवता म्हणाला.
मुलांना समजावून घ्यायचं तर आपण मूल व्हायला पाहिजे, हे आम्ही साने गुरुजींकडून शिकलो. ऑरकुटची गंमत समजावून घेण्यासाठी मी स्वतःच ऑरकुटचं मेंबर व्हायचं ठरवलं. तसं मेंबर होण्यासाठी कुणी तरी आपल्याला आमंत्रण द्यावं लागतं. माझे सगळे समवयस्क मित्र साधं चहाचं आमंत्रण देणार नाहीत, तिथं ऑरकुटवर कुठलं बोलवायला? शिवाय ते ऑरकुटचे मेंबर नव्हते, हा तांत्रिक भागही महत्त्वाचा होता. पण "इच्छा तिथं मार्ग' म्हणतात, तसं झालं. माझ्या कॉलेजमधील एक वर्गमैत्रिणीनं माझा ई-मेल आयडी कुठून कुठ ून शोधून मला ऑरकुटचं आवातन दिलं. माझ्या डोळ्यासमोर तिचं कॉलेजमधलं रूप तरळत होतं. प्रत्यक्षात ऑरकुटवरल्या फोटोंमध्ये ती त्या काळात तिची आई जशी आणि जेवढी दिसायची, तशी दिसत होती. त्यामुळे तिच्याशी सततचा संवाद साधण्याचा माझा उत्साह काहीसा मावळलाच.

पण त्या निमित्तानं मी ऑरकुटवर भरपूर भ्रमंती केली. एक अभ्यासाचा भाग म्हणून अर्थात. आपला मुलगा तिथं जाऊन काय करतो, कुणाशी गप्पा मारतो, त्याचे मित्र कोण, मैत्रिणी कोण, तो त्यांच्याशी काय बोलतो.... या वयात मुलाला एवढे मित्र आणि मुख्य म्हणजे मैत्रिणी आहेत, हे पाहून मन थक्क झालं.

हे सारे मित्र पुण्यातलेच, आसपास राहणारे, रोज भेटणारे, असे असताना हा त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद न साधता ऑरकुटवर जाऊन काय गप्पा मारतो? "दोन डोळे शेजारी- भेट नाही संसारी' असा सगळा प्रकार. मुलाला ""बाबा रे, ही सारी व्हर्च्युअल रिऍलिटी आहे. खऱ्या हाडामांसाच्या माणसांना भेट. त्यांच्याशी थेट बोल. त्यांना समजावून घे. खरी "माणसं' वेगळीच असतात रे बाळा...'' असं कळवळून सांगावंसं वाटलं. पण हे सांगण्यासाठी तरी तो समोर भेटायला हवा ना?

मुलाला ऑरकुटवर "सरप्राइज! सरप्राइज!! सरप्राइज पॉप्स!!!' असा गमतीशीर मेसेज ठेवला. म्हटलं, संवादाचा हा मार्ग अवलंबू या. संवादाचं "माध्यम' महत्त्वाचं नाही, "संवाद' महत्त्वाचा.
दुसऱ्याच दिवशी विकी गंभीर चेहऱ्यानं माझ्याशी बोलायला आला, ""बाबा, हे काय लावलंय तुम्ही?''

विकी रागावला की मला "बाबा' म्हणतो. त्यामुळे प्रसंगाचं गांभीर्य माझ्या तत्क्षणी लक्षात आलं. ""तुम्ही ऑरकुटवर का आलात? आणि माझी, माझ्या फ्रेंडचे अकाउंट उघडून वाचलेत ना? लाज- लाज आणलीत बाबा तुम्ही. एखाद्याचे वडील मेंबर होणं हे फार लाजिरवाणं मानतात....''

""अरे, पण तुझ्याशी संवाद साधावा म्हणूनच हे सारं...'' मी खुलासा करू लागलो.
""बाबा, मी फायनल वॉर्निंग देतो... क्वीट ऑरकुट! एक तर तुम्ही तरी बाहेर व्हा, नाही तर मी तरी होतो. ऑरकुटवर आपल्या दोघांपैकी कुणी तरी एकच राहील.'' त्यानं निर्वाणीच्या सुरात सांगून टाकलं. विकीचा त्याच्या मित्र-मैत्रिणींशी असणारा संवाद ?ुटायला नको म्हणून मीच ऑरकुटमधून बाहेर पडायचं ठरवलं.

पूर्वीचे बाप मुलांना बडवायचे, वाट्टेल तसे बोलायचे, शिव्या घालायचे. मुलांशी संवाद साधण्याची ही रासवट पद्धत आता मागं पडली. मी प्रेमानं विकीला समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचं भावविश्‍व जाणून घेण्याचा, त्याच्याशी गोडीगुलाबीनं संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याला बापाशी बोलण्याचीच इच्छा नव्हती. किंबहुना तो मी त्याच्यासमोर आलो रे आलो की मांजराला पाहून उंदरानं पळून जावं तसा लगेचच तो काढता पाय घ्यायचा.

वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमध्ये सारे जण "मुलांशी संवाद साधा' असं कानीकपाळी ओरडून सांगत असतात. पूर्वी म्हणायचे, निदान जेवणाच्या टेबलावर तरी सारे जण एकत्र गप्पा मारत जेवण घ्या. म्हणून मी आणि शुभा (माझी धर्मपत्नी), आम्ही दोघांनाही रात्रीचं जेवण न चुकता विकीबरोबरच घ्यायचं, असं ठरवलं. पण तो त्याची प्लेट उचलून सरळ बाहेर टीव्हीसमोर जाऊन बसायचा आणि एकता कपूरची "कौन करता है प्यार?' ही हिंदी मालिका पाहत बसायचा. (त्या वेळी हे ऑरकुटचं फॅड नव्हतं.) तो काय बघतो हे बाप या नात्यानं जाणून घेणं हा माझ्या कर्तव्याचाच भाग होता. त्यामुळे तो बाहेर येऊन टीव्ही पाहू लागला की मीही त्याच्यापाठोपाठ माझी प्लेट घेऊन येऊन बसायचो. रोज बघून बघून मलाही "कौन करता है प्यार?' मालिकेची गोडी लागली. मग बिचारी शुभा एकटीच आत जेवत का बसेल? तीही आमच्या मालिकानंदात सहभागी झाली.

आमच्यात संवाद जर झालाच तर "कौन करता है प्यार?' या मालिकेविषयीच व्हायचा. म्हणजे आता कम्मो कुणालशी लग्न करणार की रोहितशी? परमिंदरनंच कम्मोच्या डॅडींना मारलं असणार. चॉंदनी नेमकी कुणाची मुलगी?.... या गंभीर प्रश्‍नांवर आमच्यात गंभीर चर्चा व्हायची. विकीच्या जरी नाही तरी मालिकेतल्या पात्रांच्या भवितव्याविषयी (का होईना, पण) आमच्यात संवाद व्हायचा. संवाद व्हायचा, हे महत्त्वाचं. मोठा मजेचा काळ होता तो. ऑरकुट सुरू झालं आणि आमचं तेही सुख हरपलं.

असेच एका संध्याकाळी गावाकडं माझे काका वारले. तसं त्यांचं वय झालेलंच होतं. संध्याकाळी सहाला ते गेले, तेव्हापासून रात्री बारापर्यंत विकी ऑरकुटवर बसला होता. त्यामुळे चुलतभावाचा फोन आमच्यापर्यंत पोचू शकला नाही. त्यामुळे आमचं अंत्यदर्शन हुकलं. हे फार मोठं नुकसान झालं, अशातला भाग नाही. जिवंत असतानासुद्धा त्यांचं तोंड फार पाहण्यासारखं होतं, अशातला भाग नाही. पण या प्रसंगानं "लॅंडलाइन दीर्घकाळ अडून राहणं बरोबर नाही,' हा साक्षात्कार आम्हाला घडला.

ब्रॉडब्रॅंड घेणं हा एक त्यावरचा उपाय होता. पण त्याचं कनेक्‍शन सहजी मिळत नव्हतं. तशात विकीचा सोळावा वाढदिवस मध्येच आला आणि ते निमित्त साधून मी त्याला नोकियाचा एक झकास मोबाईल सेट भेट दिला.

""वौ!'' विकीचे डोळे लकाकले. ""पॉप्स, यू आर ग्रेट!'' तो प्रेमाचं भरतं येऊन म्हणाला.

""आता तुझ्याजवळ, आईजवळ आणि माझ्याजवळ सेलफोन आलेला आहे. तेव्हा आता रोजच्या रोज पॉप्सला, आईला भरपूर फोन करायचे, काय?'' मी कौतुकाच्या अंगानं त्याला इष्ट तो मेसेज दिला आणि त्याचबरोबर लॅंडलाइनचा फोन आमच्या नातेवाइकांसाठी खुला करून दिला. प्रत्यक्षात एकमेकांशी बोलायला तर सोडाच, पण आमनेसामने यायलाही आम्हा तिघांनाही वेळ व्हायचा नाही. एक तर दहावीचे क्‍लासेस करता करता विकीचा पार पिट्ट्या पडायचा. त्यामुळे नाही म्हटलं तरी मोबाईल फोनमुळे आमच्यातला संवाद वाढला, यात शंकाच नाही. आता घरी येण्याला उशीर होणार असेल तर आम्ही एकमेकांना सेलफोनवर मेसेज देऊ लागलो. एखादा चुटका आवडला तर विकी तो लगेचच आम्हाला फॉरवर्ड करायचा आणि मग तो चुटका वाचून आमची हसता हसता पुरेवाट व्हायची. आता फादरज्‌ डेचा, मदरज्‌ डेचा मेसेज विकी मोबाईलवरूनच आमच्याकडे धाडू लागला. मित्रमैत्रिणींशी मोबाईलवरून तो खुशाल दीड दीड- दोन दोन मिनिटं गप्पा मारत बसायचा. पण आम्ही आई-बाप मात्र दोन ओळींच्या मेसेजचे धनी. मेसेज तर मेसेज. तुका म्हणे त्यातल्या त्यात....

एकदा तो असाच नेटवर गुंगलेला असताना मध्येच माझ्याकडं वळून म्हणाला, ""पॉप्स, सी... आता अमेरिकेत ना प्लॅंचेट करणारे आत्म्यांना थेट मोबाईलवरच बोलवतात.''
""काय सांगतोस काय तू?'' मी आश्‍चर्यानं उद्‌गारलो.
""हे पाहा, इथं म्हटलंय, आता आत्म्यांना प्लॅंचेट बोर्डावर बोलावणं ही कन्सेप्ट जुनी झाली. आता थेट मोबाईलवरच आत्मे बोलावण्याचा शोध तिकडल्या एका एक्‍झॉरसिस्टनं लावलेला आहे. साधारणपणे आयएसडीच्या रेटमध्ये आपण मृतात्म्यांशी वाट्टेल तितका वेळ संवाद साधू शकतो. ग्रेट ना?''

""ग्रेटच! प्रश्‍नच नाही.'' मी उत्तरलो.
""ही टेक्‍नॉलॉजी इंडियात यायला आता फार टाइम लागणार नाही, नाही का?'' विकीनं विचारलं.
""मुळीच नाही. एक-दोन महिन्यांतच ती इथं येईल.''
""ती इंडियात आली आणि सपोज तुम्ही वारलात ना पॉप्स, तर मी मोबाईलवरून तुमच्याशी खूप खूप गप्पा मारीन.'' विकी निरागसपणे म्हणाला.

माझे डोळे आनंदानं डबडबून वाहू लागले. म्हणजे मेल्यानंतर का होईना, पण हे भाग्य माझ्या वाट्याला येणार होतं तर!

Friday, October 20, 2006

हनुमान

Originally written by Shri. Vaibhav Joshi
आक्रित विक्रित
वगैरे काय काय
घडायला लागलंय...
पोरगं येता जाता
चक्क पाया पडायला
लागलंय....||

का तर म्हणे Daddy सध्या
मी Superman नाही Hanuman आहे....
मी म्हणलं होक्का?
छान आहे!! ||


बायको म्हणाली
सोन्यासारखं पोर माझं
करतंय संस्कृतीचं रक्षण
चेष्टा सुचतीय तुम्हाला
जळ्ळं मेलं लक्षण... ||


अंजनीच्या पठिंब्याने
पवनपुत्र हसू लागला
घरातला झिरोचा बल्ब
ही त्याला सुर्याचा गोळा' दिसू लागला..... ||

रोज नवे पराक्रम..
रोज नवे उड्डाण..
बिल्डिंग हवालदील....
सोसायटी हैराण ||


संध्याकाळी घरी येताना
रोज चिंता जागलेली
कोण जाणे आज
कोणत्या लंकेला आग लागलेली... ||


शेवटी शेपूट सरसावून म्हणालो
'प्रिये हे अवघड होत चाललंय विलक्षण
हे केवळ टि. व्ही. चं खूळ आहे,
नाही संस्कृतीचं रक्षण'.. ||


म्हणाली उतरतंय जरासं खूळ तो आता जरा
At Ease होतोय..
पण मला बाई वेगळीच चिंता लागलीय
उद्या लॉर्ड कृष्णा रिलीज होतोय....||

Wednesday, October 11, 2006

सुरक्षेची पाहणी

नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर असे म्हटले गेले की बैंकांमधील गर्दी पाहता हल्ले होण्याची शक्यता जास्त आहे. मह्णून मी विचार केला की सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करावी.
सर्व्प्रथम मी "बैंक ऑफ ईंडिया" मध्ये गेलो आणि माझी बैग एका बाकड्यावर ठेवून हळूच एका रांगेत जाऊन उभा राहिलो. दोनच मिनिटांत सुरक्षारक्षक माझ्याकडे आला आणि बैग जवळ ठेवण्याबद्दल सांगितले.
नंतर मी SBI मध्ये गेलो. तीच पद्धत परत वापरण्याचा प्रयत्न केला. आणि लगेचच एका सामान्य माणसाने मला बैगबद्दल टोकले. नंतर कळाले की तो सामान्य माणूस एक पोलिस कॉन्स्टेबल होता सामान्य वेषात.
नंतर ICICI. ही बैंक तर अत्याधुनिक यात्रणा वापरण्यासाठी नेहमीच ओळखली जाते. मी बैग ठेवून वळाल्याबरोबर एक कर्मचारी मझ्याकडे आला आणि हळूच मला म्हणाला "सर, कैमेरा की नजर सब तरफ़ है".. बिचारा मी..

या सर्वानंतर आता माझी खात्री आहे की बैंकामध्ये मी सुरक्षीत आहे. मात्र मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही पण अशा प्रयोगांमार्फ़त स्वतःच्या सुरक्षेची खात्री करून घ्या. अंतिमतः केवळ जनशक्तीच या विराष्ट्रीय तत्वांशी सर्वोत्तम प्रकारे लढू शकते.

जय हिंद..

आजारी ग्रंथालय



"आजारी ग्रंथालय" हा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेलच. मात्र जर एखाद्या ग्रंथालयाला पुस्तके हलवण्यासाठी स्ट्रेचरची मदत घ्यावी लागत असेल तर हे थोडेसे विचित्र वाटेल ना..
तसे विशेष काही नाही. केवळ मेडिकल कॉलेजचे सान्निध्य आणि पुस्तके हलवण्यासाठी स्ट्रेचरमुळे होणारी मदत या गोष्टिंनी प्रभावित होऊन आम्ही स्ट्रेचरची मदत घेतली होती.

Sunday, October 08, 2006

कणा

परेशच्या "संवाद" या मराठी ब्लॉगमध्ये ही कविता मिळाली. मस्त आहे अगदी..

ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

क्षणभर बसला, भेसूर हसला
बोलला वरती पाहून
मुंबईमधून आत्ताच आलो
आलो बॉम्ब लावून

माज चढल्या सैतानासारखा
लोकल्स मधून नाचलो
साथी सारे पकडले जातील
मीच एकटा वाचलो

वाटलं होतं बॉम्ब लावून
मुंबईची वाट लागली
मुंबईमात्र नेहमी सारखीच
पुन्हा धावायला लागली

खिशाकडे हात जाताच
वर बघून म्हटला
पैसे नकोत सरदार
मनात भकासपणा दाटला

मुंबईकरांचं धैर्य पाहून
मोडलाय माझा कणा
छातीवरती बंदुक ठेवून
फक्त मर म्हणा!

माहितीचा अधिकार आणि गांधीगिरी

लगे रहो पाहिल्यानंतर सर्व जण गांधीगिरी करण्यासाठी एकदम उत्साहाने तयार आहेत. पण नेमके करायचे काय हा प्रश्न मात्र प्रत्येकासमोर आहे. "माहिती अधिकार कायदा २००५' हे यासाठी अत्यंत योग्य आणि परिणामकारक अस्त्र आहे. गेल्या वर्षभरात देशभरातील हजारो नागरिकांनी या कायद्याचा वापर करून बाबूगिरीला नमवले आहे. गेल्या वर्षी १२ ऑक्‍टोबरला संपूर्ण देशात माहिती अधिकार कायदा लागू झाला. या कायद्याबाबत संपूर्ण देशात बऱ्यापैकी जागृती झाली आहे; परंतु अजूनही फार मोठ्या प्रमाणावर जागृतीची आवश्‍यकता आहे.

माहिती अधिकार कायद्याला एक वर्ष पूर्ण होत असतानाच जास्तीत जास्त नागरिकांनी याचा वापर करावा, या हेतूने या कायद्याचा परिणामकारक वापर झालेल्या काही प्रातिनिधिक "गांधीगिरी' या ठिकाणी वाचा.

Saturday, September 30, 2006

माझी नेम प्लेट

आता मी lecturer असल्यामुळे माझ्या टेबलवर माझे नाव असलेली नेम प्लेट असणे आवश्यक आहे. हो ना?
तर त्या नेम प्लेटचेच हे काही फोटो..


"लगे रहो मुन्नाभाई' स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठविणार!

"ऑस्कर' पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या गटासाठी भारतातर्फे "रंग दे बसंती' हा चित्रपट पाठविण्यात आला असला तरी "लगे रहो मुन्नाभाई' हा सध्या गाजणारा चित्रपट स्वतंत्रपणे "ऑस्कर' स्पर्धेत भाग घेणार आहे. .......
अमेरिकेतील "इरॉस इंटरनॅशनल'च्या वतीने केन नाज या चित्रपटाच्या ऑस्करमधील सहभागाचा अर्ज भरणार आहेत.

"फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'तर्फे दरवर्षी ऑस्करसाठी भारतातून एक चित्रपट पाठविला जातो. काही दिवसांपूर्वी या संस्थेच्या सदस्यांनी "रंग दे बसंती'ला "ऑस्कर'साठी प्राधान्य दिले होते. गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत "फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'च्या या निर्णयाबद्दल चर्चा सुरू होती. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी "रंग दे बसंती'च्या तुलनेत "लगे रहो मुन्नाभाई'ला ऑस्कर स्पर्धेत यश मिळण्याची अधिक संधी आहे, असे मत व्यक्त केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर "लगे रहो मुन्नाभाई'चे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी आपला चित्रपट स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील असंख्य "फॅन्स'नी ई मेलद्वारे आम्हाला आमच्या चित्रपटाबद्दल पसंती कळवली असल्याने "ऑस्कर' स्पर्धेत स्वतंत्रपणे आपण सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे चोप्रा यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात या चित्रपटाचा एक खास "शो' येत्या २७ तारखेला होणार आहे. त्यावेळी या विद्यापीठातील विद्यार्थी तसेच हॉलीवूडमधील प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जॉर्ज लुकास, रॉन हॉवर्ड, जेम्स आयव्हरी यांसारख्या मान्यवरांनी या विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.


--------------------
ये हुईना बात...

Friday, September 29, 2006

तो मीच आहे.. !!!


या राजबिंड्या तरुणाबद्दल काही बोलायची गरज आहे का? well, हा मझा नुकताच घेतलेला एक फोटो..

Sunday, September 17, 2006

जमलंच नाही

जमलंच नाही ..!
जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...

रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,
वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं..

कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,
कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...

तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,
सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...

निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,
माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

Thursday, September 07, 2006

देवाला पाण्यात घाला !!!

कधी विचार केलाय की थोड्याशा पावसाने महाराष्ट्रात पूर का येतो? का वाढते पाण्याची पातळी इतक्या लवकर? काय होते त्या लाखो गणेश मुर्त्यांचे ज्या आपण दरवर्षी जलार्पन करतो?
१*१ फ़ूटाच्या एका मुर्तीत अंदाजे १ किलो शाडू वापरली जाते. अशा लाखो मुर्त्यांपासून तयार होणारी लाखो टन शाडू गाळ बनून पाण्याच्या पायथ्याशी साजून राहते. यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात बदलते. शिवाय मुर्ती बनवताना वापरण्यात येणा~या क्रुत्रीम रंगांचे पाण्य़ावर व जलचरांवर होणारे दुष्परिणाम सांगायची काही गरज नाही. सुञास कथन न लगे !!
या वर्षी मी स्वतः एक प्रयोग केला. गणेशमुर्ती मी स्वतःच्या घरी एका टोपल्यात विसर्जीत केली. २४ तास उलतून गेल्यावरही अद्याप २% देखील प्रुथक्करण झालेले नाही आहे. या वरून आपण अंदाज लावू शकता की जलचरांना किती दिवसांपर्यंत हा त्रास सहन करावा लागतो..
टिळकांनी गणेशचतुर्थीचा सण सुरू केला तेव्हा हा विचार नक्कीच केला नसणार..
एका मोठ्या कलाकाराने काही महिन्यांआधी "देवाला पाण्यात घाला" असे विधान केले होते. मी म्हणेन "खुशाल घाला, पण घरच्या पाण्यात. सार्वजनिक पाण्यात नाही" !!!

साथ

हवी कशाला साथ कुणाची,
माझेच आकाश अन् माझी धरती...
असाच एकटा चालत राहीन,
आभाळ घेऊनी खांद्यावरती...

Wednesday, September 06, 2006

माझी भटकंती

भटकंती. हा शब्द तसा पूर्वीपासूनच परिचयाचा. मात्र हा शब्द माझ्या आयुष्याचा भाग बनून जाईल असे कधी वाटले नव्हते. माझ्या भटक्या आयुष्याची सुरूवात झाली मझ्या अभियांत्रीकीच्या तीसर्या वर्षी. तसं तर मी सुरूवात पेब या थोड्या कठिण गडापासून केली. मात्र खर्या अर्थाने मला आवड निर्माण झाली ती लोहगड या गडापासून. तत्पूर्वी सरसगड या गडाला पाहून मला चढायची इच्छा झाली होती. त्याबद्दल पुढे बोलेनच.
आजवर मी भेट दिलेल्या गडांविषयी थोडेसे सांगण्याचा हा प्रयत्न.

लोणावळ्याजवळ असणारा लोहगड पूर्वीपासून बोरघाटाचा रक्षक म्हणून कार्यरत होता. विंचू काटा ही नैसर्गिक माची, अभेद्य तटबंदी ही या गडाची वैशिष्ट्ये.. हा गड पुणे - मुंबई महामार्गावरून हमखास नजरेस पडतो.


लगतचा विसापूर किल्ला हा त्याच्या अखंड तटबंदीमूळे प्रसिद्ध आहे. मळवली स्थानकावरून समोर लोहगड नजरेस येतो. पण डोंगरामागे लपलेला विसापूर मात्र भजे गावात गेल्यावरच दिसून येतो. पूर्वीपासून दुर्लक्षित असा हा किल्ला इतिहासात फारसे स्थान मिळवू शकला नाही.


तिकोना हा गड प्रथमच trekking च्या उद्देशाने चढलो. हा छोटेखानी किल्ला तुंगच्या जोडीने पूर्वी checkpost प्रमाणे वापरला जायचा. हा गड नंतर प्रत्येक ऋतूत आणि दिवसाच्या प्रत्येक वेळी मी केला आहे. या गडावरून दिसनारे सौंदर्य अगदीच अवर्णनीय आहे. समोर पसरलेला पवना जलाशय आणि उत्तुंग असा तुंग ही जोडी सौंदर्याची अगदी लयलूट करते.


शेजारचा तुंग देखील मी एकदा चढलेलो आहे. इथून दिसणारी लोहगड-विसापूरची जोडगोळी व त्यांचे सौंदर्य शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य. किल्ल्याच्या नावावरून असे वाटते की हा गड चढायला खूप अवघड असेल. मात्र असे नाही आहे. हा छोटासा गड दोन तासात चढून व पाहुन होतो.


सुधागड हे भोर संस्थानचे वैभव. भोराईदेवीचे स्थान असल्यामुळे या गडाला भोरपगड असेही म्हटले जाते. झाडांमध्ये वसलेल्या या गडाचा विस्तार प्रचंड आहे. त्याचप्रमाणे गडावर होणारी निसर्गाची मुक्त उधळन ही एकदातरी अनुभवायलाच हवी. या गडाची तटबंदी आजही बर्याच प्रमाणात शाबूत आहे.


विद्येची देवता असलेल्या गणेशाच्या पाली या गावाला लागूनच उभ्या असलेल्या सरसगड या गडाला पाहून मला सर्वप्रथम trekking ची इच्छा झाली. पाली गावच्या दक्षिणोत्तर दिशेला या गडाची नैसर्गिक भिंत उभी आहे. या गडाचा वापर मुख्यत्वे टेहाळणीकरिता केला जात असे.


"गडांचा राजा व राजांचा गड" असा उल्लेख राजगड या गडाविषयी केला जातो. बुलंद, बेलाग व बळ्कट राजगड आजही आपल्या हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्यापासून ४८ किमी अंतरावर नीरा - वेळवंडी - कानंदी - गुंजवणी नद्यांच्या खो~याच्या बेचक्यात मुरूंबदेवाच्या डोंगरावर हा गड उभा आहे. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या या गडाने तब्बल २३ वर्षे हा मान बाळगला. तीन नैसर्गिक माच्या व कठिण बालेकिल्ला यामुळेच हा गड बेलाग आहे.


माथेरानसारख्या गर्दीच्या ठिकाणाहून थोडे बाजूला असलेला पेब हा सूंदर गड निसर्ग्प्रेमींसाठी नक्कीच एक सुखद बदल आहे. इथे असणारी नैसर्गिक गुहा तसेच गुहेसमोरचे द्रुश्य हे शब्दांत वर्णने अवघड आहे. गड चढताना जंगल मात्र थोडेसे घनदाट आहे. वरून दिसणारे सुर्योदय व सुर्यास्त मी कधीच विसरनार नाही.


रायगड ही छत्रपतींची राजधानी. महाडपासून २५ किमीवर असणारा हा गड विस्ताराने बराच मोठा आहे. व चांगल्या प्रकारे जतनदेखील केला गेलेला आहे. याच गडावर छत्रपतींची समाधीदेखील आहे. इथून चहूबाजूंना दिसनारे सह्याद्रीचे अक्राळ-विक्राळ रूप पाहून हबकून जायला होते. छत्रपतींच्या पावन स्पर्शामूळे या गडास एका देवस्थानाचा दर्जा आहे.


पुण्यापासून ३० किमी अंतरावर असणारा सिंहगड हा दुरदर्शनच्या मनो~यामुळे चटकन लक्षात येतो. या गडावर घडलेला तानाजी मालुसरेचा इतिहास ऐकून गहिवरून येते. आज मात्र हा गड अगदी विषन्न अवस्थेत आप्ल्या शेवट्च्या घटका मोजत आहे.


महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यामध्ये सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणजे मल्हारगड. पुण्यापासून जवळच असणारा हा किल्ला साधारनतः त्रिकॊणी असून आतील बालेकिल्ल्यास चौकोनी आकाराचा तट आहे. तटबंदी व बुरूजाची काही प्रमाणात पडझड झाली असली तरी ब~याच प्रमाणात ती शाबूत आहे. जवळच असणा~या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' असेही म्हटले जाते.


कोयना नदीच्या खो~यात घनदाट वनराजींमध्ये लपलेले दुर्गरत्न म्हणजे वासोटा. वाघांच्या सानिध्यामुळे या गडाला व्याघ्रघड असेही म्हटले जाते. या गडावरून दिसणारे कोयना पाणलोट क्षेत्राचे सौंदर्य अगदी अवर्णनीय आहे. तसेच नव्या व जुन्या वासोट्याच्या मध्ये असणार्या बाबुकडा या कडेवरून येणारा प्रतिध्वनी अनुभवायलाच हवा.


एखाद्या गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा उत्तम नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतुहलजनक तर भूगोल विस्मयजनक आहे. कोकणगडा हा या गडाचा सर्वात विस्मयजनक भाग. १.४ किमी उंच व १.४ किमी त्रिज्या असणारा हा अंतर्वक्र कडा हा कोकणातून वाहणा~या वा~यामुळे तयार झालेला आहे. इथे उभे राहून भन्नाट वा~याचा अनुभव घेतल्यानंतर हा आयुष्यातला सर्वोच्च बिंदू वाटेल.


भोरपासून अगदी जवळ असलेला रोहिडा हा छोटासा किल्ला २ तासांत पाहून होतो. गडावरून दिसणारे राजगड व येसाजी कंक तलावाचे मनोहारी दर्शन मनाला आनंद देऊन जाते.




छत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरी हा किल्ला चढायला अगदी सोपा आहे. ऐतिहासिक द्रुष्ट्या महत्त्वाचा असल्याकारणाने हा सुंदर किल्ला ब~याच प्रमाणात संरक्षित केलेला आहे. जुन्नर शहरात प्रवेश करताच हा किल्ला दिसू लागतो. अशा या सुंदर गडाचा सहवास मात्र मला अगदी अल्प वेळ लाभला.

या प्रत्येक ठिकाणाबद्दल मी पुढे विस्ताराने लिहिणारच आहे. अपेक्षा आहे आपल्याला आवडेल. आपल्या प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत...

Saturday, September 02, 2006

दु:ख

दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरू पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले "दोस्तांनो!!"
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेंव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!!

तेंव्हा पासून फिरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कोनाच्या ही नजरेत...

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दुःख ढसाढसा रडले!!

नशा सगळ्यांची उतरली
दुःखाकडे पाहून!
दुःखालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुध्दा फिरतोय
दुःखाला शांत करायाचा
खूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख-दुःख सारथी
सुख मिळाले तर दुःखाच्या घरी
मीच देईन पार्टी!!

Wednesday, August 23, 2006

कुस्तीतील "राजा हरिश्‍चंद्रा'ला जीवनगौरव

महान कुस्तीगीर आणि निष्ठावान प्रशिक्षक हरिश्‍चंद्र बिराजदार यांना केंद्र सरकारचा ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे लातूर्च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. यापुर्वी "काका पवार" या लातूर्च्या कुस्तीविरास अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

या पुरस्कारामुळे आतापर्यंतच्या कामाचे चीज झाले असून, यानंतरही आणखी जोमाने मल्ल घडवेन, अशी प्रतिक्रिया श्री. बिराजदार यांनी व्यक्त केली....

""पोटाच्या दुखण्यामुळे मला कुस्ती अचानक थांबवावी लागली, तेव्हा निराश झालो होतो. मात्र प्रशिक्षण सुरू केल्यानंतर पुन्हा मन रमले. गोकुळ वस्ताद तालमीत मी गुरुकुल पद्धतीने मल्ल घडवितो आहे. या कामी तालमीचे अध्यक्ष शंकरराव आगाव, चिटणीस व्यंकटराव परसे, उपाध्यक्ष पंढरीनाथ पठारे अशा सर्वांचेच बहुमोल सहकार्य मिळत आहे,'' असे श्री. बिराजदार म्हणाले.

"रुस्तम-ए-हिंद' हरिश्‍चंद्र बिराजदार
- १९६९ मध्ये दादू चौगुले यांना हरवून "महाराष्ट्र केसरी' किताब, त्याच वर्षी कानपूरच्या स्पर्धेत "हिंदकेसरी' किताब.
- ७० च्या एडिंबरा (स्कॉटलंड) राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण.
- ७१ मध्ये नेत्रपालला हरवून "रुस्तम-ए-हिंद'चा बहुमान.
- ७७ मध्ये दिल्लीचा नामवंत मल्ल सतपालला बेळगावच्या मैदानात चितपट केले. हाच कारकिर्दीतील परमोच्च बिंदू.
- गोकुळ वस्ताद तालमीत गुरुकुल पद्धतीने मल्ल घडविण्याचे कार्य गेले एक तप सुरू. अर्जुन पुरस्कार विजेता काका पवार, गोविंद पवार, राजेश बारगुजे आदी अनेक नामवंत मल्लांना मार्गदर्शन.

माझे कॉलेज

माझ्या महाविद्यालयाचे (MIT Pune) विमानातून घेतलेले हे छायाचित्र.


Tuesday, August 22, 2006

बाप

बरेच प्रस्थापित तसेच नविन साहित्यीक "आई" या विषयावर लेखन करतात. पण वडिलांबद्दल कोणी फारसे लिहीलेले ऐकण्यात नाही. अशाच दुर्मिळ लिखानापैकी एक लेख माझ्या हातात आला. तो तुम्ही या लिंकवर वाचू शकता.

*~-मेगा बम्पर ऑफर ~*

इस ब्लॉग्पर comment भेजें और जीतें आकर्षक पुरस्कार........

* 10 लाख रूपये वाली कार का फोटो
* 29" टी.वी. का बॉक्स
* लंदन जाने वाले हवाई जहाज को "टाटा" कहने का सुनहला अवसर
* और अन्तिम किन्तु सबसे आकर्षक ईनाम......
"मेरे साथ डिनर, आप के घर"

Saturday, August 19, 2006

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे......... कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,

म्हणुन....................म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

स्वातंत्रदिन

प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीदेखील मी स्वातंत्रदिन साजरा करण्यासाठी MIT महाविद्यालयात गेलो होतो. या cadetsना राष्ट्रीय ध्वजास संपूर्ण गर्वाने Salute करताना पाहणे खरोखरच खूप प्रेरणादायी असते. या parade नंतर एक बैठक व त्यानंतर मस्त मेजवानी असे कार्यक्रमाचे स्वरूप असते. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे..







Friday, August 18, 2006

कलेचे राजनितीकरण

मागील काही दिवसांपासून मी वृत्तपत्रामधून दादासाहेब फाळके पारीतोषिकाबद्दलच्या बातम्या वाचतोय. त्यात प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते. हे वृत्तपत्र कला क्षेत्रात राजनिती आणण्याचा प्रयत्न करतोय. उदा. "बंगाली नायिकेस पारीतोषिक मिळावे म्हणून सोमनाथ चॅटर्जी, प्रियरंजन दासमुन्शी, प्रनब मुखर्जी इ. नेते प्रयत्न्शील", "महाराष्ट्रातर्फ़े फक्त शरद पवार प्रयत्न करत आहेत" अशा प्रकारच्या बातम्या या वृत्तपत्रातून येत आहेत.
काय आपल्याकडे पारितोषिकांचा इतका खराब काळ आला आहे की आता हे राजकिय नेते पारितोषिकासाठी पात्र व्यक्ती ठरवणार? असेही राजकीय नेत्यांपेक्षा जास्त "नौटंकी" कोण करू शकतो?
७५ पेक्षा जास्त वर्षांची परंपरा असणारे हे वृत्तपत्र एकिकडे खेळात राजकारण आणल्याबद्दल नेत्यांवर टिका करतो आणि दुसरीकडे त्याच नेत्यांकडून अपेक्षा करतो की त्यांनी कलेच्या क्षेत्रात राजकारण आणावे. या दुटप्पीपणाच्या धोरणाला काय म्हणावे?

Sunday, August 13, 2006

रायगड


अवघ्य़ा महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचे रायगड हे राजधानी स्थान. याच ठिकाणी छत्रपतींची समाधीदेखील आहे.
या गडाचे google earth द्वारा घेतलेले हे छायाचित्र..

पाणी

बरेच दिवस झाले मराठीत काही लिहीले नाही. काय लिहावे हे सुचतच नाही हल्ली. पूर्वी पावसाला पाहून मस्त कविता सूचत. हल्ली फक्त भीती वाटते.
मान्सून पावसाच्या आगमनाच्या वेळी मी खूप खूश होतो. मी माझ्या ब्लॉगवर देखील त्या बातम्या टाकत होतो. मॉन्सून आला, बरसला आणि बरसतच राहीला. परत जाण्याआधी तो एक भेट्वस्तू मात्र देऊन गेला. पाणी.. खूप पाणी.. सगळीकडे पाणी.. पाणीच पाणी.. फक्त पाणी.... घरात, दुकानांत, कारखान्यांत, रस्त्यात आणि डोळ्यांत..
बाकी सगळीकदचे पाणी तर निघून जाईल.. पण डोळ्यांचे काय? ते पाणी कोण शोषून घेणार?

Saturday, August 12, 2006

धूम्रपान एक कार्य महान

सिगरेट है संजीवनी
पीकर स्वास्थ्य बनाओ
समय से पहले बूढ़े होकर
रियायतों का लाभ उठाओ

सिगरेट पीकर ही
हैरी और माइकल निकलते हैं
दूध और फल खाकर तो
हरगोपाल बनते हैं
जो नहीं पीते उन्हें
इस सुख से अवगत कराओ
बस में रेल में घर में जेल में
सिगरेट सुलगाओ

अगर पैसे कम हैं
फिर भी काम चला लो
जरूरी नहीं है सिगरेट
कभी कभी बीड़ी सुलगा लो
बीड़ी सफलता की सीढ़ी
इस पर चढ़ते चले जाओ
मेहनत की कमाई
सही काम में लगाओ

जो हड्डियां गलाते हैं
वो तपस्वी कहलाते हैं
ऐ कलयुग के दधीचि
हड्डियों के साथ करो
फेफड़े और गुर्दे भी कुर्बान
क्योंकि…
धूम्रपान एक कार्य महान

Friday, July 07, 2006

Orkut

Orkutवर मला जॉईन होण्य़ासाठी http://www.orkut.com/Profile.aspx?uid=16639138348211919876 या लिंक्वर क्लीक करा..

Tuesday, June 13, 2006

बराहा IME

Baraha Direct नंतर आता Baraha IME हे नविन टूल आले आहे. वापरून पहा. नक्की आवडेल..

Monday, May 29, 2006

मोसमी पाऊस कोकणात दाखल

नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज कोकण किनारपट्टीवर दाखल झाला. केरळमधील आगमनानंतर वेगाने आगेकूच करीत अवघ्या तिसऱ्या दिवशी तो वेंगुर्ल्यात येऊन पोचला. .......
केरळ, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी, गोवा, उत्तर कर्नाटक, रायलसीमा, आंध्र किनारपट्टी, बंगालच्या उपसागराचा ईशान्येकडील भाग, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आदी भाग मोसमी पावसाने व्यापला आहे. येत्या २४ तासांत पश्‍चिम बंगाल आणि सिक्कीम येथे त्याचे आगमन होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविला आहे. मोसमी पावसाचा अक्ष सध्या वेंगुर्ला, बळ्ळारी, ओंगल आणि गंगटोक या ठिकाणांवर स्थिरावला आहे.

सर्वसाधारणपणे आठ जूनच्या सुमारास मोसमी पाऊस पुण्यात दाखल होतो. यंदा तो लवकर दाखल झाल्याने आणि त्यानंतर वेगाने आगेकूच करीत असल्याने पुण्यातही त्याचे वेळेआधीच आगमन होण्याची शक्‍यता आहे; मात्र तो नेमका कधी पुण्यात दाखल होईल, याचे संकेत अद्याप मिळाले नसल्याचे येथील वेधशाळेच्या संचालक (हवामान अंदाज) रोहिणी लेले यांनी सांगितले.

पुण्यात आज दिवसभर ढगाळ हवामान होते. सायंकाळच्या सुमारास आकाश अंधारूनही आले होते. काही वेळ जोराचा वारा सुटला; मात्र पाऊस झाला नाही. पुण्याचे कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. येत्या २४ तासांत शहरात पाऊस होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे; तसेच दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी, केरळ, आसाम, मेघालय, नागालॅंड आदी ठिकाणी जोराचा पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.



-------------------
ताजा कलम:

काही वेळापूर्वी पूण्यात पावसाला सुरूवात झाली. नैर्ऋत्य मोसमी पाऊस पूण्यात आला.

Sunday, May 28, 2006

आरक्षणाचे भविश्य


्तुम्हाला हेच हवे आहे का?

पाऊस

काल पाऊस झाला. परवा पण झाला होता. मग फरक काय दोन्हीमध्ये? आहे.. नक्कीच आहे..
परवाचा पाऊस घेऊन आला होता भूतकाळ, आठवणी आणि अश्रू..
आणि कालचा पाऊस घेऊन आला भविश्य, आशा, विश्वास आणि हास्य..

मला मुंबईच्या Akna Infotech या कंपनीत नौकरी मिळाली. आणी ही वार्ता मिळाल्यावर थोड्याच वेळात पाऊस आला.. जणू हा पाऊस माझे अभिनंदन करायला आला होता..

Friday, May 26, 2006

पहिला पाऊस

आज अखेर पुण्यात पाऊस झाला. आणि सोबत बर्याच आठवणी घेऊन आला. गेल्या वर्षीचे पहिल्या पावसात एकत्र भिजणे मला आठवले. आणि आठवले तिचे अचानक माझ्या आयुष्यातून निघून जाणे...


पहिला पाऊस
मनात भरलेला
ह्रदयापर्यंत जाऊन
आठवणीत भिजलेला

भिजवूनी माती
जागविल्या स्मृती
हर एक थेंबातूनी
जाग्या झाल्या राती

झालं आभाळ सुनं
गाणं संपलं पावसाचं
आठवतं मला तेव्हा
तुझं असच निघून जाणं

Friday, April 28, 2006

मी वाट पाहतोय...

शिळोप्याच्या चार गोष्टी करणा-या दोस्ताची मी वाट पाहतोय !
तिचा सुवास घेऊन गुणगुणणा-या वा-याची मी वाट पाहतोय !

लोटला किती काळ त्याची मोजदाद केली नाही मी कधी
हिशोब क्षणाक्षणाचा आता लागण्याची मी वाट पाहतोय !

क्षणभरासाठीच् भिजवून गेली सर ती एक श्रावणाची
निसटलेल्या थेंबांचे मोती बनण्याची मी वाट पाहतोय !

कधी हटेल दूर ही गर्द ग्रहणाची छाया काळी
मुक्त होवून चांदणं बरसण्याची मी वाट पाहतोय !

उमटतील आपसुकच् सूर सर्व अंतरीचे
जरा मैफिल तुझी बहरण्याची मी वाट पाहतोय !

हृदयातून तुला साद दिली आहे मी कधीची
हृदयास तुझ्या ती भिडण्याची मी वाट पाहतोय!

Wednesday, April 12, 2006

शिवरायांच्या गडांना कॉपोर्रेट किल्लेदार?

शिवकालीन मुत्सद्दी रामचंद नीळकंठ अमात्य यांनी साडेतीनशे वर्षांपूवीर् दिलेला ' परम सावधपणे असतील त्या गडकिल्ल्यांची यथोक्त मजबुदी करावी ' या सल्ल्याची जपणूक करण्यासाठी सरकारला उशिरा का होईना जाग आली आहे. किल्ले आणि स्मारकांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कॉपोर्रट क्षेत्राची कुमक मागवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. मात्र , या निमित्ताने कॉपोर्ेरेट क्षेत्राच्या जाहिरातबाजीचे आक्रमण गड-किल्ल्यांवर होऊ नये , असा इशारा इतिहासाच्या अभ्यासकांनी दिला आहे.

राज्यातले ऐतिहासिक किल्ले तसेच स्मारकांच्या देखभालीसाठी कॉपोर्रेट कोऑपरेशन घेण्याचा मानस सांस्कृतिक खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच विधिमंडळात बोलून दाखवला. इतिहासाचे अभ्यासक निनाद बेडेकर यांनी या कल्पनेचे स्वागत केलं. ते म्हणाले , ' कशी का होईना , किल्ल्यांची अवस्था सुधारत असेल तर चांगलंच आहे. आज हालचाली केल्या नाहीत , तर 60-70 वर्षांनी या किल्ल्यांच्या जागी फक्त डोंगरच राहतील. मात्र कॉपोर्रेट मदत घेताना किल्ल्यांवर डोळ्यांना खुपणारी जाहिरातबाजी होऊ देता कामा नये.

गिर्यारोहक हृषिकेश यादव यांनी देखील ही घोषणा स्वागतार्ह असल्याचा अभिप्राय दिला. किल्ले राखण्यासाठी अशी काही पावले उचलायलाच हवीत. मात्र , त्याचवेळी गडांचे पावित्र्य सांभाळले गेले पाहिजे. गडाच्या मूळ वास्तूची हानी होता कामा नये , असं यादव म्हणाले.

आज पुरातत्त्व विभागाकडे पुरेसा पैसा नाही. मग किल्ल्यांची वास्तपुस्त होणार कशी ? आता कॉपोर्रेट क्षेत्राच्या साह्याने ती होत असेल , तर काही हरकत नाही , असं गडभ्रमंतीचा मोठा अनुभव असलेले ' चक्रम हायकर्स ' चे माधव फडके म्हणाले. कॉपोर्रेट क्षेत्राचा मदतीचा हात प्रसिद्ध किल्ल्यांच्या मदतीसाठी पुढे येऊ शकतो पण त्याचबरोबर दुर्गम किल्ल्यांनाही त्याचा फायदा होईल , असे नियम करावेत , असं फडके यांनी सुचवलं.

गड-किल्ल्यांच्या वाटा धुंडाळणाऱ्या ' क्षितिज ग्रुप ' चे श्रीरंग वैद्य यांनी देखील किल्ल्यांचे पावित्र्य राखले जाणार असेल तर कॉपोर्रेट क्षेत्राची मदत घेण्यात काहीच हरकत नाही , असं मत नोंदवलं. रायगड जिल्ह्यात पालीजवळ सुधागड किल्ल्यासाठी सीमेन्स कंपनीनं असं काम केलं आहे , अशी माहिती त्यांनी दिली.

Thursday, April 06, 2006

MIT NCC TROOP

या संस्थेबद्दलचे माझे विचार मी इथे एका कवितेमार्फत ठेवत आहे. ज्यांना या संस्थेबद्दल माहीत आहे त्यांना माझे विचार कळून येतील.

जस्सं च्या तस्सं राहील का सारं?
हाक नुसती ऐकून थांबेल का वारं?

TROOPमधील हे दिवस येतील का परत?
मिळतील का मला ही तीन वर्षे परत?

परेड च्या वेळी चढलेला जोश
होळीला केलेला जल्लोश
NCC show साठी रात्रभर जागणं
आणि हार्दीकच्या रूमवर जाऊन movie पाहणं

Trek साठी location शोधत राहणं
आणि location सापडल्यावर जल्लोशात नाचणं
Rotational साठी Donors शोधणं
आणि Emergency ला धाऊन जाणं

Main drive ला झालेली धावपळ
आणि wafers खाण्याची चंगळ
hall समोरची सुंदरसी रांगोळी
Blood donation ला येणारया WEC च्या पोरी

Trad day ला केलेली मजा
आणि अंकितचा द्रौपदी अवतार
हातात तलवार घेऊन
परिसचे म्हणणे खबरदार

अजयसोबत भांडण, अलोकसोबत संभाषण
आणि ते सर्व Group Discussions
Blood Donation चे पोस्टर्स
शंतनूचे attendance मस्टर

ट्रेकसाठी केलेली shopping
ट्रेकपूर्वी केलेली Packing
गड चडताना मिळालेली साथ
व अडखाळल्यावर समोर आलेले हात

canteen मध्ये जाऊन चहा टाकणं
CIPLA टाळण्यासाठी कारणं सांगणं
प्रत्येक B'day ला पार्टी घेणं
आणि सगळ्यांच placement celebrate करणं

छोट्याशा गोष्टीवर सारंगला रागावणं
आणि परत तोच येऊन sorry म्हणणं
मित्रांसोबत खूप खूप भांडणं
आणि परत त्यांच्याच खांद्यावर रडणं

मिळ्तील का मला हे मीत्र परत?
सापडेल का आयुष्याचं सूत्र परत?

खूप दिलं या troop ने मला
खरे मीत्र इथेच गवसले मला

आज मी जात आहे
troop पासून दूर
पण मी नेहमीच असेन
एका हाकेच्या अंतरावर

आमच्या juniors कडून

्काही दिवसांपूर्वी आम्हाला MIT NCC TROOP मधून send off देन्यात आला.. त्यवेळी आमच्या juniors नी आम्हाला एक कविता अर्पण केली..

माझ्या भावना



प्रिय सीनियर्स,


बघता बघता वर्ष संपलं
कालचा नवा मी आज जुना झालो

तेव्हा फारसं काही कळत नव्हतं
सर, तुम्ही सांगुनही बरंचसं काही जमत नव्हतं
तरी तुमच्या मनात माझ्यासाठी कायम प्रेमच होतं

तुमची ती कणखर वाणी
त्याहून करडी नजर
वाटत नव्हती मला भीती
पण होता केवळ तो फक्त एक आदर

उद्या कदाचीत विस्तारेल तुमच्या माझ्यातलं अंतर
पण तरीही मनात कायम दरवळतील
तुमच्या स्म्रुती निरंतर...


--आपल्या जूनियर्स कडून

Monday, March 27, 2006

आठवण

आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .

आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .

जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. . .

आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .

दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी"

Thursday, March 09, 2006

तुझी आठवण


तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तू गेलीस,
पण ती मात्र
बिलगून राहीली..

तू जाताना
मी तूला
हसून निरोप दिला..
पण नंतरच्या माझ्या कोसळण्याची
साक्षीदार होती
तुझी आठवण.....

तू गेल्यावर
विरहाचा श्रावण बरसला..
तेव्हा हळूच येऊन
माझे अश्रू पुसणारी होती
तुझी आठवण.....

तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तू गेलीस,
पण ती मात्र
बिलगून राहीली..

Tuesday, February 28, 2006

Gmail सर्वोत्तम नाही

Gmail has pagerank 9/10
Google च्या मते Gmail सर्वोत्तम नाही आहे आणि म्हणूनच Gmail चा Pagerank ९/१० आहे, जो १०/१० असायला हवा.
Pagerank बद्दल माहिती या ठिकाणी आहे.

Sunday, February 26, 2006

तोंडात पाणी

परवा रक्तदान शिबीराच्या वेळी केलेली ही सजावट पाहून नक्की तुमच्या तोंडात पाणी येईल..



Saturday, February 25, 2006

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
आपण सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.. आपल्यावर सदैव शिवशंभुची क्रुपा राहो..

Monday, February 20, 2006

रक्तदान: जीवनदान

रक्तदान: जीवनदान
MIT NCC TROOP ही संस्था २२ फ़ेब्रुवारी, २००६ बुधवार रोजी संत ज्नानेश्वर हॉल, MIT, पुणे या ठिकाणी एका रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे. क्रुपया, आपल्या वेळापत्रकातील २० मिनीटे एका माणसाचे प्राण वाचवण्यासाठी वापरा.
अपेक्षा आहे की एका सहभारतीयाशी "रक्ताचे नाते" जोडण्यासाठी आपण सर्व जण पुढाकार घ्याल.
धन्यवाद

Sunday, February 19, 2006

मांसाहार


सर्व मांसाहारी लोकांनो, वरील चित्र पहा व फ़क्त एकदा विचार करा.

सजा

मिली है बहोत सजा
उनसे दिल लगाने की
नजर लग गयी
हमारे प्यारको जमानेकी

कबर से निकले हुये
दोनो हाथ कहते है
आरजू रह गयी
उन्हे गले लगानेकी

Friday, February 17, 2006

माझी विविध रूपे

मी काही कोणी अष्ट्पैलू व्यक्ती किंवा एखादा देखना नट वगैरे नाही आहे. केवळ आपल्याला माझी काही छायाचित्रे दाखवण्यासाठी ही उठाठेव. मला ठाऊक आहे या post ला लोड होण्यासाठी खूप वेळ लागेल व त्याबद्दल मी हार्दिक क्षमस्व आहे.
तोपर्यंत लातूर ब्लॉग अथवा माझा मूळ ब्लॉग पाहायला काय हरकत आहे? या लिंकवर click केल्यास नविन window open होईल. त्यामूळे आपण बिन्धास्त click करू शकता.



पिरॅमिड मेगास्टोर, SB रोड चे उद्घाटन प्रसंगी


होय मीच


माझे घर


माझी आवडती भेळ


ंमाझी FE रूम


Laptopसहीत


अभ्यास (अति दुर्मीळ छायाचित्र)


NCC Web siteसाठी काम करताना


माझी नकारात्मक (Negative) बाजू:)


हरीद्वार येथे लखनवी पोषाखात


NCC show 2005 साठीचा पोषाख बनवताना


लांब केस


Traditional Day 2005


Traditional Day 2006


आशिष सोबत एक जूना फ़ोटो


सह्याद्रीसोबत असताना मला कोणत्याही बिछान्याची गरज नाही


तिकोना किल्ला साफ़ करताना


ंगडप्रेमी मी


भटक्या मी

Google